Tuesday 23 October 2012

Vrajareshwari Devi - Vasai


 श्री वज्रेश्‍वरी देवी 

                       वसई शहराच्या दक्षिणेकडे समुद्रकिनाऱ्यालगत वसईचा प्रसिद्ध किल्ला आहे.सन 1738 पर्यंत हा किल्ला पोर्तुगीजांच्या अमलाखाली होतापोर्तुगीज प्रजेचा छळ करीत असतही हकिकत पेशव्यांच्या कानी पडली आणि पेशव्यांनी श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे यांची वसई किल्ल्याच्या मोहिमेवर नेमणूक केलीचिमाजी आप्पा पेशवे आपला फौजफाटा घेऊन वसईच्या कामगिरीवर निघालेभिवंडी तालुक्‍यातील वज्रेश्‍वरी येथे पेशव्यांच्या सैन्याचा तळ पडला.लहान-मोठे तंबू, राहुट्या अकलोलीपासून गणेशपुरीपर्यंत पसरल्या.अमावास्येची रात्र होती. सर्व सैन्य झोपी गेले होते. परंतु चिमाजी आप्पांना झोप येईना. मध्यरात्र उलटून गेली. पहाटेचा पहिला प्रहर झाला. तरीही झोपेचे नाव नव्हते. बेचैनी वाढू लागली. अखेर पहाऱ्याच्या बंदोबस्तावर नजर फिरवावी म्हणून ते बाहेर पडले. तेथे त्यांना कुंडाजवळ एक आकृती दिसली.ते त्या आकृतीचा पाठलाग करीत निघालेते थेट कुंजकटाईजवळच्या जंगलातील वज्रेश्‍वरी देवळाजवळ त्या आकृतीच्या पाठोपाठ आलेती आकृती अचानक अदृश्‍य झालीचिमाजी आप्पा देवळात गेलेत्यांनी देवीचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले व वसई मोहिमेच्या विजयाचा देवीजवळ कौल मागितलाचिमाजी आप्पांनी देवीला नवस केला की युद्धात विजय झाला तर ज्या ठिकाणी तू मला दृष्टांत दिलास तेथे मी वसईच्या किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधीनवज्रेश्‍वरी देवीची चिमाजी आप्पांवर कृपा झाली.
                      वसई मोहीम फत्ते झाली आणि सन 1738 मध्ये पोर्तुगीजांची राजवट संपली.वसईच्या किल्ल्यावर पेशव्यांचा भगवा ध्वज दिमाखाने फडकू लागला. देवीला नवस बोलल्याप्रमाणे वज्रेश्‍वरी येथे चिमाजी आप्पांनी वज्रेश्‍वरी देवीचे भव्य मंदिर बांधून नवसाची पूर्तता केली. त्याआधी वसईच्या किल्ल्यात असलेल्या वज्रेश्‍वरी देवीचे मंदिर बांधले. हेच ते पेशवेकालीन वज्रेश्‍वरी देवीचे वसई किल्ल्यातील मंदिर होय.या घटनेला दोनशे वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर कालौघात मंदिर जीर्णशीर्ण झालेसन 1957 मध्ये किल्ल्यातील वज्रेश्‍वरी मंदिराच्या लगत असलेल्या नागेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलातद्‌नंतर वासुशेठ पै,लालजी मिस्त्रीभाऊसाहेब मोहोळकाशिनाथ नडगेदीपक गव्हाणकरडॉ.चौधरी व सुभाष पाटील या वसईतील भाविकांनी 14 जानेवारी 1994मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर श्री वज्रेश्‍वरी देवी (वसई किल्लाजीर्णोद्धार समिती स्थापून पुन्हा एकदा मंदिराच्या जीणोद्धाराचा संकल्प सोडलाअवघ्या दोन वर्षाच्या अवधीत 15 जानेवारी 1996 या दिवशी मंदिराचे काम पूर्ण झाले.आपल्या देशात मंदिराची उभारणी झाली ती प्रामुख्याने देवी नवसाला पावली म्हणून वा युद्धात विजयश्री मिळाल्याने. वसईच्या किल्ल्यातील वज्रेश्‍वरीचे मंदिरही पोर्तुगीजांवरील विजयातूनच निर्माण झाले आहे. सतराव्या शतकापासून तुर्क, मोगल यांच्या आक्रमणांनी प्राचीन हिंदू मंदिराचा मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्यात आला. काही मंदिरे कालौघात भंगली, जीर्ण झाली.किल्ल्यातील वज्रेश्‍वरीचे देवालयही असेच भग्न झाले होते.नरवीर चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला वसईचा किल्ला सर केल्यानंतर धर्मांतरासाठी पोर्तुगीजांनी किल्ल्यात डांबून ठेवलेल्या हजारो हिंदूंना मुक्त केले. किल्ल्यातील वज्रेश्‍वरी देवीच्या मंदिराबरोबर त्यांनी वसई तालुक्‍यात शंकर मंदिरे व तलाव यांची जागोजागी निर्मिती केली. पुजारी नेमले. त्यांच्या चरितार्थासाठी व मंदिराच्या व्यवस्थापनासाठी जमिनी इनाम दिल्या. कोकणातून बर्वे, कर्पे, फडनीस, साठे, परांजपे या पेशव्यांच्या वंशजांची घराणी वसई परिसरात आणून वसविली. 
                           वसई किल्लाकिल्ल्यातील वज्रेश्‍वरी देवी व वसईतील तत्कालीन समाजाला पोर्तुगीजांच्या क्रूर राजवटीतून मुक्त करणाऱ्या नरवीर चिमाजी आप्पांचा अश्‍वारुढ पुतळा पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांच्या प्रयत्नाने किल्ल्याच्या प्रांगणात मोठ्या दिमाखाने उभा आहेचिमाजी आप्पांच्या वसईवरील ऋणातून उतराई होण्याचे जणू हे प्रतीकच आहे.

Monday 22 October 2012

Jivdani Devi - Virar

जीवदानी देवी - विरार

                              विरार रेल्वेस्थानकापासून पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जिवदानी मातेचे मंदिर आहे.हा डोंगर चंदनसार,नारिंगी व विरार या गावांच्या परिसरात आहे. गडावर मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. विरारपूर्वेला नारिंगी परीसरातील अन्नपुर्णाबाई तांत्रीक महाविध्यालयासमोरील पाऊलवाट व जिवदानी रस्त्याने गडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री गणेश मंदिराकडून जाणारी सिमेंट पायरी वाट.येथे जीवदानी गडावर जीवदानी माता या देवीचे जागृत स्थान आहे. हे एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक स्थान आहे. . देवीच्या मूर्तीजवळ सुपारी लावून कौल मागण्याची प्राचीन परंपरा आहे.जीवदानी देवीचे सात मजली मंदिर २०० मीटर उंच डोंगरावर असून येथे वाशी, विरार, मुंबई, ठाणे व देशभरातून तसेच विदेशातून दरवर्षी ३० लाख भाविक भेट देतात. डोंगराच्या पायथ्यापासून देवीच्या देवळापर्यंत पोहोचण्यासाठी १३५० पायर्‍या या भाविकांना चढाव्या लागतात.
                             देवतांची पूजा म्हणजे शक्तीपूजा.दक्षयज्ञात आत्माहूती केलेल्या सतीच्या कलेवराचे श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने ५१ तुकडे केले.ज्या ज्या ठिकाणी हे तुकडे पडले तेथे देवतांची शक्तिपीठे तयार झाली.भारताबाहेर नेपाळ व बलुचिस्थान येथेही शक्तिपीठे आहेत.महाराष्ट्रात असलेल्या १८ शक्तिपीठांपैकी जिवदानी हे एक शक्तिपीठ आहे.जिवदानीच्या या डोंगरावर १७ व्या शतकाच्या सुमारास जिवधन नावाचा किल्ला होता. आजही या ठिकाणी तटाच्या बांधकामाचे कोरीव दगड भग्नावस्थेत आढळतात.चिमाजीआप्पां यांनी हा किल्ला ३१ मार्च १७३९ रोजी जिंकून घेतला.या गडावर पांडव कालीन दगडात कोरलेल्या गुंफा ही आहेत.ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या विरारच्या जीवदानी देवीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. फार पूर्वी गडाच्या पायथ्याशी एका शेतकऱ्याच्या शेतात रोज एक गाय चरण्यासाठी येत असे. दिवसभर चरल्यानंतर ती डोंगरमाथ्यावर निघून जायची. त्या गायीबद्दल शेतकऱ्याच्या मनात कुतूहल जागं झालं. एकदा त्याने तिचा पाठलाग केला. डोंगरावरच्या एका मैदानात ती गाय थांबली आणि त्याचक्षणी तिथे एक तेजस्वी स्त्री प्रकट झाली. ती गाईची मालकीण असावी असं समजून शेतकऱ्यांने तिच्याकडे , आपल्या शेतात गाय चरते म्हणून पैशांची मागणी केली. स्त्रीने शेतकऱ्याच्या हातावर पैसे ठेवत असतानाच शेतकऱ्यांने मला स्पर्श करू नकोस अशी विनंती त्याने करताक्षणीच ती तेजस्वी स्त्री नाहीशी झाली. शेतकरी अवाक् होऊन हे सर्व पाहत असतानाच त्याला दुसरा धक्का बसला. त्या गाईने मोठा हंबरडा फोडून कड्यावरून खोल दरीत स्वत:ला झोकून दिलं. गाईच्या बलिदानाचं रहस्य अजूनही गुलदस्त्यातच आहे. मात्र गाईने जीवाचं दान केलं म्हणून त्या डोंगराला ' जीवदानीचा डोंगर ' आणि डोंगरावर वास्तव करणारी आदिमाता ' जीवदानी ' म्हणून प्रसिद्ध झाली. गाईने जिथून उडी घेतली तिथे एक ' तांदळा ' ( अष्टविनायकाच्या स्वरूपातलं मूतीर्चं रूप) ठेवला होता. भाविक त्याचीच पूजा करत. पूर्वी गुराखीच शिळेची पूजा करत. त्यानंतर बारकीबाय नावाची भक्त तिथे पूजा करू लागली. १९५६ मध्ये भक्तांनी देवीच्या मूतीर्ची प्राणप्रतिष्ठा केली. २३ फेब्रुवारी १९५६ रोजी बारकीबायच्या पुढाकाराने ट्रस्टची स्थापना झाली. 
                            जीवदानीच्या पायथ्याशीच गणेश मंदिर आहे. तिथून गडाची उंची नऊशे फूट असून एकूण चौदाशे पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दुतर्फा असलेल्या हिरव्यागार नयनरम्य वनराईतून गडावर चढायला सुरुवात केल्यानंतर थकवा जाणवतच नाही. मुख्य मंदिरात दगडातच गाभारा करून तिथे देवीची मूतीर् बसवण्यात आली आहे. उजव्या हाताने भक्तांना आशिर्वाद देणाऱ्या देवीचं दर्शन होताच भाविकांचा थकवा दूर होतो. मंदिराच्या परिसरात अनेक गुंफा असून त्या पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. त्यात कालिकामाता , भैरवनाथ , बारोंडा देवीची मंदिरं आहेत. त्याच्या शेजारीच मानकुंड नावाची पाण्याची कुंडं आहेत.
डोंगरावरून विरार आणि परिसराचं विहंगम दृश्य दिसतं. डोंगरावरून खाली उतरलं की पापडखिंड धरणाच्या निसर्गरम्य परिसरात जीवदानी देवीची बहिण बारोंडा देवीचं तसंच महादेवाचं मंदिर आहे. याठिकाणी महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. 
                         जीवदानीचा डोंगरावर १७ व्या शतकात जीवधन नावाचा गडकोट किल्ला होता. तटाचे काही कोरीव दगड भग्नावस्थेत आढळतात. मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यावर २७ मार्च १७३१ रोजी फिरंगी सरदाराने हल्ला केला होता. त्यावेळी गडावर फक्त शंभर मराठे होते. म्हणून मराठे किल्ला सोडून पळून गेले. त्यानंतर चिमाजीअप्पांनी आदेश दिल्यावर बरवाजी ताकपीर याने तीनशे सैनिकांसह हल्ला करून जीवधन गड ३१ मार्च १७३९ रोजी सर केला. टेहळणीसाठी मोक्याची जागा म्हणून किल्ल्याला महत्व होतं. पण किल्ला उपेक्षित राहिल्याने त्याचं अस्तित्वच संपुष्टात आलं. मात्र जीवदानी देवीमुळे या परिसराला तीर्थस्थानाचा दर्जा मिळाला आहे. सध्या जीवदानी देवीची महती वाढल्याने इथे दरदिवशी हजारो भाविक गदीर् करतात. मंगळवार , शुक्रवारी इथे बरीच गदीर् होते. नवरात्रीचे नऊ दिवस गडावर उत्सव असतो. दसऱ्याच्या दिवशी तर एक लाखापेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीला अभिषेक , महावस्त्रालंकार परिधान केल्यानंतर घटस्थापना केली जाते. दुर्गाष्टमीला विविध पूजा केल्या जातात. विजयादशमीला महाभिषेक केला जातो. भाविकांच्या वाढत्या संख्येला आवश्यकतेनुसार मंदिराचा जीणोर्द्धार करून त्याचं विशाल मंदिरात रूपांतर करण्यात आलं आहे. मंदिराच्या सभागृहाच्या नव्वद फूट खाली असलेल्या पठारावर सात मजली इमारत बांधण्यात आली आहे. त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यासमोर पाच हजार फुटांचं सभागृह तयार झालं आहे. पायथ्यापासून गडावर चढण्यासाठी प्रशस्त पायऱ्या असून भाविकांना ऊनपावसांचा त्रास होऊ नये म्हणून पत्र्यांचं छत उभारण्यात आलं आहे. आता रोपवे नेही देवीच्या दर्शनाला जाता येते. 

Vindhyavasini Devi - Chiplun

विंध्यवासिनी  देवी -  चिपळूण




                          नंद आणि यशोदेची मुलगी जी कृष्णाच्या ऐवजी वासुदेव आणि देवकीच्या कोठडीत पोहोचली , तिला कंसाने ठार मारण्यासाठी उचलले तेव्हा ती त्याच्या हातातून निसटली आणि विंध्य पर्वतावर जाऊन राहिले तीच हि  विंध्यवासिनी  देवी .
                            १९८३ साली झालेल्या पावसात या मुल मंदिराचे मोठे नुकसान झाले , आता त्याचा जीर्नोद्धार झालेला आहे .. १५-२० उभ्या पायऱ्या चढून गेलो कि आपण सभामंडपात पोहोचतो . देवीची मूर्ती होयसाळ शैलीची  असून ती ८०० ते १००० वर्षे  जुनी असावी . मूर्तीला ८ हात असून ते महिषासुर रुपात आहे . या अष्टभूजांमध्ये  विविध आयुधे आहेत. पायाखाली रेड्याला दाबून धरले आहे . रेड्याचे शीर धडावेगळे होऊन पडलेले आहे . शेजारीच सहा तोंडाच्या कार्तीकेयाचीही सुंदर मूर्ती आहे . स्त्रिया कार्तिकेयाचे दर्शन घेत नाहीत म्हणून ती झाकून ठेवलेली आहे . दोन्ही शिल्पे अत्यंत उत्कृष्ट असून त्यावरील कोरीव काम , सुबकता , काळ्या पाषाणाची चकाकी यामुळे कलाकारां बद्दलचा आपला आदर द्विगुणीत होतो.   

Saturday 20 October 2012

Saptshrungi Devi - Vani

सप्तशृंगी देवी


               सप्तशृंगी हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तो नाशिक  जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन शक्ती पीठांपैकी एक आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभार्‍याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.
इतिहास 
      सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम सीता  वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. ऐतिहासिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले, अशी आख्यायिका आहे. तसेच महानुभावी लीळा चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम - रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत   नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदायातील नव नाथांना शबरी विद्या  प्रत्यक्ष देवीने दिली असेही नोंदवलेले आढळते. निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरी मधेय नोंदवलेला आढळतो. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे.

कथा

कोणत्याही पुरुषाकडून मरण निळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासुर  नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा , विष्णू  व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासुर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे

पूजन

पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती  होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू  नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे.नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते यात भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीच असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी पोळीही नैवेद्य  म्हणून असते.  पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज ११ मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो.

Friday 19 October 2012

Tulaja Bhavani - Tuljapur

तुळजा भवानी - तुळजापूर 

                                       तुळजापूर  हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील शहर आहे. येथे तुळजा भवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडे तीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव  व भक्तांची गर्दी असते.महाराष्ट्रातील हिंदूंच्या श्रद्धेनुसार तुळजापुरातील भवानीचे क्षेत्र देवीच्या शक्तीपीठापैकी एक आद्यपीठ आहे. उस्मानाबाद  जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूर प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे शिवाजीराजे भोसले यांच्या भोसले घराण्याची  ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजीराजांना राज्यस्थापनेची प्रेरणा मिळाली, अशी समजूत भाविकांमध्ये प्रचलित आहे. 

तुळजाभवानीचा इतिहास
                 उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पूराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.एवढेच नव्हे तर मातेचे भक्त हिन्दुस्तनतच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सति जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडुन ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणी तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणी खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.
                  गाभा-याचे मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूध झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देविने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहेत. तर दूस-या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशुल खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजुला सिंह आणि पूराण सांगणारी मांर्केडेय ऋषीची मुर्ती दिसते. देविच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सुर्य कोरलेला दिसतो.देविला स्पर्श कोणालाही करता येत नाही.देवीला पूर्वी 3 वेळा पूजा केली जात. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते.‍ गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे.तसेच दक्षिण दिशेला देविचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देविची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)

Thursday 18 October 2012

Renuka Devi - Mahur

रेणुका देवी - माहूर 




माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी  एक असून येथील पीठाची देवता रेणुका देवी  आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. आख्यायिका-
एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला . तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले . शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले . जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत . सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती . राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली . ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही . तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही , हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला . आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली .नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला . घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला . तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ' इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर ' असे सांगितले . परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले . या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले . यावेळी माता रेणुका सती गेली . या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले .
त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली . ' तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल . फक्त तू मागे पाहू नकोस .' परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले . या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ' मातापूर ' म्हणू लागले . शेजारच्या आंध्रप्रदेशात ' ऊर ' म्हणजे गाव ते ' माऊर ' आणि पुढे ' माहूर ' झाले..!!

Yogeshwari Devi - Ambejogai

योगेश्वरी देवी - अंबेजोगाई


                      श्री योगेश्वरी देवी चित्पावनांची कुलदेवता मराठवाड्यात कशी आली या विषयी एक कथा सांगितली जाते, श्री योगेश्वरी देवी , हे मुल कोकणचीच.  आडिवरे येथे देवीचे देवालय आहे. परळी वैजनाथ येथील देवाबरोबर देवीचे लग्न ठरले.  सर्व वऱ्हाडी  निघाले परंतु वाटेत अंबेजोगाई येथे नवरा पसंत नाही म्हणून नवरी रुसून बसली , लग्न मुहूर्त टाळून  गेला , तेव्हापासून देवी अविवाहित राहिली . दान्तासुर नावाच्या असुराला ठार केले म्हणून दंतासुर  असेही नाव पडले 
                   परंतु कोकणातील चित्पावनांची हे कुलदेवता कशी बनली अशी शंका निघते. या विषयी पौराणिक कथा आहे " अपरान्त " किंवा परशुरामाची भूमी म्हणूनही हा प्रांत ओळखला जातो . कोकण प्रांताची निर्मिती केल्यानंतर त्या प्रांतात शेती करण्यासाठी परशुरामांनी १४ गोत्रातून ६० कुटुंबे कोकणात नेली तसेच कोकणच्या समुद्र किनारी अर्धमृत अवस्थेत येऊन लागलेल्या १४ व्यक्तींना संजीवनी देऊन  जिवंत केल्यानंतर त्यांच्याच बरोबर विवाह लावून देण्यासाठी परशुरामांनी अंबेजोगाई येथून वठू कोकणात नेल्या .
                    आपल्या मुलींची कोकणात पाठवणी करताना अंबेजोगाईच्या लोकांना एक अट  घातली कि , कोक्णार ज्या व्यक्तींबरोबर अंबेजोगाई नेलेल्या वधूचा विवाह होईईल त्या प्रत्येक कुळणी योगेश्वरी देवीला कुलदैवत मानावे .
                  अंबेजोगाई चे मंदिर फार जुने आहे. जयंती नदीच्या काठावर पश्चिमेस साधारणपणे शहराच्या मध्यभागी देवीचे देवालय आहे , मंदिराचे शिखर कलापूर्ण आणि भव्य आहे. अनेक सुंदर शिल्पांनी देवालय सुशोभित केलेले आहे . मंदिराच्या गाभार्यात देवीची ओमकार स्वरूपी मूर्ती आहे. देवीची भव्य मूर्ती बघतच भाविकांची माने भारावून जातात .
            नवरात्रात देवीचा मोठा उत्सव होतो . नवमी अष्टमीला शतचंडीचे  पूर्णा हवन  होते. नवमीला महाभोग होतो. दसऱ्याला सुवासिनी खणा  नारळाने ओटी भरतात . संपूर्ण शहरातून देवीची पालखी निघते. मार्गाशिर्षातहि सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत देवीचा उत्सव होतो.
         

Tuesday 16 October 2012

Mahalaxmi Mandir - Kolhapur


महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर 



                  महालक्ष्मी मंदिर पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. ते कोल्हापूर (करवीर ) इथे  आहे. मंदिराच्या मांडणीवरुन ते चालुक्यांच्या  काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे.कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरेल. पुराणे, अनेक जैन ग्रंथे , ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकुट किंवा त्या आधीचा शिलाहार  राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.या देवस्थानाची महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पिठात गणना होते.मुसलमानांनी देवळाचा विध्वंस केला तेव्हा मूर्ती अनेक वर्षे पुजाऱ्याने लपवून ठेवली होती. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ. स १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.महलक्ष्मि ही विष्णूची  भार्या व म्हणून समोर गरुड मंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे.देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.
इतिहास 
महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले हे निश्‍चितपणे सांगता येत नसले तरी ख्रिस्तोस्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे महात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते. कारण राष्ट्रकुट  नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात  आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कऱ्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्‍तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार  देवीचे निस्सिम भक्‍त होते. आपणास देवीचा "वरप्रसाद" मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो.काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे. देवळाचे शिखर आणि घुमत संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्या  यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन  पंथियांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्‍मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ .स. १७२२ मध्ये दुसऱ्या संभाजीने  त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी संभाजीने सिधोजी हिंदुराव घोरपडे ला  पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते.हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाड पंथी  वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगर खाना  आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा  असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा  असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महलक्ष्मि ची  मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप  लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरुड  मंडप असे म्हणतात. अश्विन  नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात.

सूर्यकिरणे 

             कार्तिक  आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते.या दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभाऱ्यापर्यंत पोहचतात आणि तेथून ते महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहचतात आणि तेथून हळूहळू तिच्या मस्तकापर्यंत जातात. हा चमत्कार जवळ जवळ पाच मिनटांपर्यंत चालतो. या दिवशी देवीला खास प्रार्थना केली जाते. हा चत्मकार पहाण्यासाठी भाविक मोठया संख्येने जमा होतात. हा मुहूर्त पुजारी पंचांग  पाहून ठरवितात. देवळाची बांधणीच अशातऱ्हेने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.

           शुक्रवार , मंगळवार  हे देवीचेदिवस मानले जातात. दर शुक्रवारी व अश्विन , कार्तिक , मार्गशीर्ष  व माघ  या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार - चोपदार  व पालखीचे भोई  असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता  हत्ती , घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. नवरात्रात नऊ  दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश , फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य  वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा  मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मि व्रत  करण्याची प्रथा आहे. देवीला हळद कुंकू  वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर उद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. या घागरी फुंकणाऱ्या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो. व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात, असा समज आहे. 

Monday 15 October 2012

Mumbai - Mahalaxmi Mandir

महालक्ष्मि  मंदिर  - मुंबई 


                  मुंबई मधील अतिशय प्रसिद्ध असे महलक्ष्मि मंदिर  भुलाभाई देसाई रोड , महलक्ष्मि इथे आहे. अतिशय प्राचीन अश्या ह्या मंदिराची स्थापना   १८३१ मधेय धाकजी दादाजी ह्यांनी  केली .
अशी एक आख्यायिका  आहे कि , १९१२ मधेय मुंबई चे गव्हर्नर होर्नबी ह्यांची समुद्राचे फानसिंग करण्यास सुरवात केली , परंतु हे काम पूर्ण होऊ शकले नाही , तेव्हाचे कंत्राटदार रामजी शिवाजी पाठारे ह्यांच्या स्वप्नांत देवी महलक्ष्मि आली आणि तिने सांगितले ; "समुद्रातील देवीची मूर्ती बाहेर काढ आणि देवळात तिची स्थापना कर "  , कंत्राटदाराने देवीच्या सांगण्या प्रमाणे केले आणि त्या नंतर त्यांचे अर्धवट राहिलेले कमीही पूर्ण झाले  .
       मंदिरात गाभार्यात महलक्ष्मि , महाकाली आणि महासरस्वती अश्या तीन देवीच्या मूर्ती आहेत . तीनही देवीच्या मूर्तींना अतिशय सुंदर असे सजवलेले आहे. नाकात नाथ , सोन्याच्या बांगड्या आणि मोत्याचे दागिने अश्या अलंकारांनी सजवण्यात आलेले आहे.
      नवरात्र मध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव केला जातो  .